संबंधित माहिती
- राहुल गांधी आपल्या बहुचर्चित पदयात्रेसाठी येत्या नोव्हेंबर महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात येणार
- ‘स्कूल चले हम जीएसटी के साथ’,आता फक्त भाषणावर जीएसटी लावायची बाकी आहे – मा. छगन भुजबळ
- कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट
- “प्रो गोविंदा”स्पर्धा घेण्याची घोषणाबक्षिसांची रक्कम शासनामार्फत
- “..तर याची किंमत राज्यातल्या गावांना मोजावी लागेल”
भास्कर जाधव मुद्दे मांडत असताना नितेश राणे मध्येच बोलल्याने वाद
रवींद्र चव्हाण आणि सुनील प्रभू यांच्या प्रश्नोत्तराचा तास सुरु होता. भास्कर जाधव आपले मुद्दे मांडत होते. मात्र. नितेश राणे मध्येच भास्कर जाधवांना टोकताना दिसले. त्यामुळे मध्ये मध्ये बोलणाऱ्या नितेश राणे यांना काहीतरी शिकवा, अशी विनंती जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना केली.
जाधव मुद्दे मांडत असताना राणे मध्येच बोलल्याने वाद
“मी प्रश्न विचारून थकलो आहे. तुमचे अधिकारी मात्र तेच तेच उत्तर देतात, असा टोला जाधव यांनी राज्य सरकारला लगावला. २०२३ हा आकडा कायम आहे, परशूराम घाटाचा विषय कायम आहे, लोकांच्या कोर्ट कचेरीचा प्रश्न आहे. कोर्ट कचेरी पनवेल ते इंदापूर थोडीशी आहे, बाकी कुठे नाही, असे आपले मुद्दे मांडत असताना मध्येच नितेश राणे बोलले. त्यावर मला तुम्हाला विचारण्याची आवश्यकता वाटत नाही. मी सरकारला विचारतो”, असे भास्कर जाधव म्हणाले.
