गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 13 जून 2021 (10:36 IST)

अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील'- तुषार भोसले यांचे अजित पवारांना आव्हान

फोटो साभार -सोशल मीडिया 
आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नसून हा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील, असा इशारा भाजप प्रणित अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी दिला आहे.
 
मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत यंदा पायी वारीला परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने वारी करण्यास परवानगी दिलेली नाही.
हा निर्णय घेऊन राज्य सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे, अशी टीकाही तुषार भोसले यांनी केलीय. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
राज्य सरकारने आपली भूमिका मागे घेतली नाही तर असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील आणि यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास याला उमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील असं आव्हान तुषार भोसले यांनी दिलं आहे.
 
राज्यातील मानाच्या दहा पालख्यांसाठी बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी 20 बसेस दिल्या जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.