बगळ्यांच्या हत्येचा प्रकार, सयाजी शिंदेंनी मुलांना सुनावलं  
					
										
                                       
                  
                  				  घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर बगळ्यांची कत्तल होत असल्याचा प्रकार अभिनेते सयाजी शिंदेंनी समोर आणला आहे. हा प्रकार थांबायला हवा. त्यासाठी पोलीस प्रशासनानं योग्य कारवाई करायला हवी, असं आवाहन शिंदेंनी केलं आहे.
				  													
						
																							
									  
	
	उड्डाणपुलाचा अंदाज न आल्याने बगळ्यांचे थवे पुलाच्या एकदम जवळून जात असतात. अशावेळी बाजूच्या वस्त्यांमधील मुले या पुलावर उभे राहून बेचकीच्या सहाय्याने या बगळ्यांना मारून खाली पाडतात आणि नंतर आपल्या सोबत घेऊन जातात.
				  				  
	 
	हा सर्व प्रकार अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत मुलांना रोखण्याचा प्रयत्न केला.