1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (09:48 IST)

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाची झडप, 5 मृत्युमुखी तर अनेक जखमी

लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाने झडप घातली .या अपघातात 5 जण दगावले. औरंगाबाद येथील वैजापूरजवळ शिवराई फाट्याजवळ दोन आयशरचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले आहे. 
जालनातील अंबड तालुक्यातून हे वऱ्हाड नाशिकला जात असताना पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 23 हुन जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींना नाशिक आणि औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मृत झालेल्या पाच जणांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे.