1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2024 (20:11 IST)

वर्षा गायकवाड यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली

varsha gaikwad
मुंबई NEET-UG मधील कथित अनियमिततेबद्दल काँग्रेसच्या मुंबई विभागाच्या प्रमुख वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्या त्यांच्या पक्षाने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या .

त्यांनी या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन का बाळगले आहे असा प्रश्न उत्पन्न केला. त्या म्हणाल्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा. 
 
पंतप्रधान मोदी यांनी एक शब्दही उच्चारला नाही. शिक्षणाचे राजकारण करू नये, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. असेही त्या म्हणाल्या.
 
नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वर्षा गायकवाड या मुंबई उत्तर मध्य विभागातून लोकसभेवर निवडून आल्या. 
 
नीट पेपरच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा मागितला आहे.  
 
Edited by - Priya Dixit