मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: नागपूर , सोमवार, 29 सप्टेंबर 2014 (11:48 IST)

खलनायक कोण? हे जनताच ठरवेल- फडणवीस

भाजपची खरी लढाई काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात आहे. आम्हाला कोणाच्याही टीकेला उत्तर द्यायचे नाही, खलनायक कोण? हे राज्यातील जनताच ठरवेल, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.

शिवसेनेसोबत भाजपने युती तोडली. त्यामुळे महायुतीत फूट पडल्यावर भाजपला खलनायक ठरवण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून होत आहेत, याकडे लक्ष फडणवीस यांनी वेधले मात्र, सावध भूमिका घेतली.

भाजपपुढे भ्रष्ट सरकार दूर करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे कोणाच्याही टीकेला आम्हाला उत्तर द्यायचे नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नागपूर येथे झालेल्या जाहीर सभेत फडणवीस बोलत होते.