शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (13:28 IST)

रोग, शोक आणि संताप दूर करण्यासाठी, 'स्थिरता शक्ति योग' करा

जर तुमच्या मनात किंवा शरीरात कोणत्याही प्रकारची अस्वस्थता, तणाव, नैराश्य जाणवत असेल तर तुम्हाला रात्री झोप येणार नाही. बर्‍याच लोकांचे मन आणि जीभ खूप चालते, ज्यामुळे अशांतता देखील उद्भवते. यामुळे गंभीर आजार देखील होऊ शकतात. हा योग तुमचे शरीर आणि मन दोन्ही स्थिर करेल. प्रत्येक कामात मन स्थिर आणि शरीर निरोगी ठेवणे आवश्यक असते. म्हणूनच तुम्ही 'स्थिरता शक्ति योग' चा सराव केला पाहिजे.
 
1. पतांजलीच्या योगसूत्रच्या विभितिपाद मध्ये 'स्थिरता शक्ति योग' याबद्दल माहिती आढळते.
 
2. शरीर आणि मन-मेंदूला वेगाने स्थिर करण्याच्या दोन पद्धती आहेत:- पहिला म्हणजे केवली कुंभका प्राणायाम आणि दुसरा म्हणजे कूर्मनाडीमध्ये संयम करणे.
 
3. केवली कुंभक प्राणायामचा अर्थ आहे की चालत-फिरत असताना किंवा उठत-बसताना कुठेही श्वास आणि जीभ हालण्यापासून काही सेकंद थांबवणे. स्वत:ला स्टॉप करण्याची क्रिया आहे केवली. श्वास बाहेर आहे तर बाहेरच थांवून द्या आणि आत आहे तर आतच राहू द्या.
 
4. संयम बाळगून दुसऱ्या कूर्मनाडीमध्ये स्थिरता येते. स्वरयंत्रात कच्छपा आकाराची नाडी आहे. त्याला कूर्मनाडी म्हणतात. घशातील छिद्र ज्याद्वारे हवा आणि अन्न पोटात जाते त्याला कंठकूप म्हणतात. या घशाच्या कूपात संयम साधण्यासाठी सुरुवातीला दररोज प्राणायाम आणि शारीरिक उपवास करणे आवश्यक आहे. यामुळे हळूहळू दृढनिश्चय आणि संयम जागृत होईल.
 
फायदे: योगामध्ये असे म्हटले आहे की सिद्धीसाठी शरीर आणि मनाची स्थिरता आवश्यक आहे. याचा सराव केल्याने सिद्धींचा मार्ग खुला होतो. जर तुम्ही सिद्धींची काळजी केली नाही, तर जेव्हा शरीर स्थिर असेल, तेव्हा रोग, शोक, संताप आणि दुःख दूर होतील आणि मनात शांती निर्माण होईल. तुम्ही असा विचार करणार नाही की ज्यामुळे चिंता निर्माण होते, तुम्ही ते खाणार नाही ज्यामुळे रोग होतो आणि तुम्ही असे करणार नाही ज्यामुळे त्रास होतो. हा योग कोणत्याही परिस्थितीत फायदेशीर ठरेल.