Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IPL 2019: मुंबई इंडियन्स चौथ्यांदा चॅम्पियन

Updated: रविवार, 12 मे 2019 (23:56 IST)
 
रायुडूच्या रुपात चेन्नईला तिसरा धक्का बसला. रायुडूला एका धावेवर समाधान मानावे लागले. 11 व्या ओव्हरमध्ये बुमराहने अंबाती रायडूला तंबूत पाठवलं.
 
चेन्नईच्या चाहत्यांना तेव्हा धक्का बसला जेव्हा धोनी दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता आणि त्यावेळी दुसरी धाव घेतना इशान किशनने नॉन स्ट्राइक येथे असलेल्या स्टम्पवर थेट चेंडू मारला. तिसऱ्या 
 
पंचांकडे हा निर्णय सुपूर्द करण्यात आला होता. तिसऱ्या पंचांनी धोनीला आऊट दिले.
 
शेन वॉटसनचे अर्धशतक झाल्यानंतर चेन्नईला पाचवा धक्का ब्राव्होच्या रुपात बसला. 
 
मुंबईकडून कायरन पोलार्डने सर्वाधिक 41 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 29 धावा केल्या. तर ईशान किशनने 23 धावा केल्या.
 
कॅप्टन रोहित शर्माने 15 तर हार्दिक पांड्याने 16 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला पण चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईच्या 
 
धावसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
 
दीपक चहरने तीन विकेट तर शार्दुल ठाकूर आणि इम्रान ताहिर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
 
आतापर्यंत सात वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत गेलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा मुकाबला मुंबई इंडियन्सशी होता. दोन्हीही टीमने आतापर्यंत तीन तीन वेळा ही स्पर्धा जिंकली.
 
 2018, 2011 आणि 2010 या तीन वर्षांत चेन्नईने अंतिम सामना जिंकला होता. मुंबई इंडियन्सने 2013, 2015 आणि 2017मध्ये आयपीएलची स्पर्धा जिंकली होती.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात उतरणार, सामना सकाळी किती वाजता सुरू होणार?

९३ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी झाली, मानव सुथारने इतिहास रचला; एका विशेष क्लबमध्ये स्थान मिळवले

बीसीसीआयने दलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचे ठिकाण बदलले, विजेतेपदाचा सामना बंगळूरुऐवजी चेन्नईत होणार

भारताने श्रीलंकेला १६५ धावांनी हरवले, ६०० वा कसोटी सामना जिंकला

देवदत्त पडिक्कलने गॉल कसोटीत एक मोठी कामगिरी केली, तिसरा भारतीय खेळाडू ठरला

पुढील लेख
Show comments