suvichar

अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन

Updated: बुधवार, 28 मार्च 2018 (11:01 IST)
 
मॅट्रिक झाल्यावरच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली होती. प्रतिष्ठान` नियतकालिकातून त्यांनी सुरुवातीला लेखन केले आणि त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर विपूल लेखन केले. दलित साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी केलेले बरेच लेखन हे दलित साहित्याच्या अनुषंगाने असेच आहे. त्यापैकी `धम्मचर्चा` `मूल्यवेध`, मुकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे. अस्तितादर्श` या नियतकालिकाच्या संपादकपदाची महत्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. तसेच दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे त्यांनी संपादन केलेले काही ग्रंथ. चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे नियतकालिका म्हणून अस्मितादर्श कडे पाहिले जाते.डॉ. गंगाधर पानतावणे हे मराठीतील लेखक, समीक्षक व विचारवंत आहेत. दलित साहित्य व दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक आहेत. औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजात ते मराठीचे प्राध्यापक होते.डॉ. गंगाधर पानतावणे यांनी २००९ साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

हवामानातील बदलांमुळे होणारे गुडघेदुखीसाठी ही खबरदारी घ्यावी

ऑनलाइन पार्टनरला पहिल्यांदाच भेटत असल्यास या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

नैतिक कथा : नास्तिकाने आपली दिशा बदलली

Rose Gulkand Ghevar Recipe एक प्रसिद्ध आणि शाही गोड पदार्थ ''रोज गुलकंद घेवर''

एनर्जी ड्रिंक पिण्यापूर्वी १० वेळा विचार करा! पाहा हे ५ गंभीर दुष्परिणाम

पुढील लेख
Show comments