संबंधित माहिती
- नाशकात प्रथमच “इतक्या”वाजता निघणार गणेश विसर्जन मिरवणूक
- सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदनावाच्या अहवालातून आला समोर
- मुंबईकरांना आता “या”ठिकाणी गणपती मूर्ती विसर्जन स्थळाची माहिती मिळणार
- नवनीत राणा यांना ‘सी’ग्रेड अभिनेत्री म्हटलं आहे
- आता डावा हातही तुरुंगात जाणार आहे,तुम्ही पोराची काळजी घ्या
गणपती विसर्जनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज
बुधवारपासून येत्या आठ दिवस म्हणजे १४ सप्टेंबपर्यंत संपूर्ण राज्यभरात विजा आणि गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, येत्या तीन दिवसांत गणपती विसर्जनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबईसह संपूर्ण कोकणात, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विशेषत: जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक विभागातदेखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, परतीच्या पावसासाठीची सुरुवात झाल्याचे अनुकूल वातावरणीय वेध सध्या स्थिरवल्यासारखे जाणवतात. त्यामुळे माघारी फिरणारा मोसमी पाऊस कदाचित वेळ घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
