1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. Janve to be changed after eclipse

ग्रहण संपल्यानंतर यज्ञोपवीत/जानवे बदलावे का?

Janve to be changed after eclipse
"सर्वेषामेव वर्णानां सूतकं राहुदर्शने ।" असे सांगितलेले आहे. अर्थात ग्रहणाचे  सूतक हे सर्व वर्णियांना असते.
त्याचप्रमाणे जानवे कधी बदलावे यासंबंधी पराशरांचे वचन पुढीलप्रमाणे आहे - "सूतकान्ते उपाकर्मे गते मासचतुष्टये । नवयज्ञोपवीतं तु धृत्वा जीर्णं विसर्जयेत् ।।" 
अर्थात सूतक संपल्यानंतर , उपाकर्माचेवेळी, चारमहिने वापरल्यानंतर जीर्ण यज्ञोपवीताचा त्याग करून नवीन यज्ञोपवीत धारण करावे असे सांगितलेले आहे. या वचनात सूतक संपल्यावर जानवे बदलावे असे सांगितलेले आहे व ग्रहणात सर्वांना सूतक प्राप्त होत असल्यामुळे ग्रहणानंतर जानवे बदलतात.
पुढील लेख
जगन्नाथ पुरी धाम: 13 आश्चर्यकारक तथ्य