शनिवार, 13 सप्टेंबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 15 मे 2021 (13:03 IST)

जयंती विशेष: भगवान श्री रामांचा सर्वात आवडता मित्र केवट कोण होता ते जाणून घ्या

nishad raj jayanti
भगवान श्री राम यांचे प्रिय मित्र निषाद राज यांच्या जयंती निमित्त केवट समाज द्वारे भव्य रुपता शोभा यात्रा काढण्यात येते व प्रसाद वितरण केलं जातं. यंदा कोरोनामुळे हे शक्य नाही तरी प्रभू श्रीराम यांचे प्रिय सखा केवट बद्दल जाणून घ्या-
 
पौराणिक ग्रंथांनुसार, केवट हा भोई घराण्याचा होता आणि तो नाविक म्हणून काम करायचा. केवट रामायण यातील एक विशेष पात्र आहे, ज्यांनी प्रभु श्रीरामाला वनवास दरम्यान सीता व लक्ष्मण यांना आपल्या नावेत बसून गंगा पार नेले होते.
 
निषादराज केवट यांचे वर्णन रामायणाच्या अयोध्याकांड मध्ये केले गेले आहे.
राम केवट यांना आवाज देतात- नाव किनार्‍याला आणावी, पलीकडे जायचे आहे.
 
मागी नाव न केवटु आना। कहइ तुम्हार मरमु मैं जाना॥
चरन कमल रज कहुं सबु कहई। मानुष करनि मूरि कछु अहई॥
 
- श्री राम यांनी केवटला नाव आणण्यास सांगितले पर ते आणत नाही. ते म्हणतात- मला आपला हेतू कळला आहे. आपल्या चरणातील धूळबद्दल लोकं म्हणतात की ती मानवाला जड करुन देते. ते म्हणतात की आधी माझ्याकडून पाय धुवून घ्या नंतर नावेत चढवतो.
 
केवट प्रभु श्री रामांचा भक्त होता. केवटला त्यांना पायांना स्पर्श करायचे होते. त्यांचं सान्निध्य मिळवायचं होतं. केवटला वाटत होतं की त्यांनी सोबत नावेत बसून आपलं गमावलेलं सामाजिक हक्क प्राप्त करावं. आपल्या संपूर्ण जीवनात केलेल्या कष्टाचं फळ मिळवा.
राम तसंच करतात जसं केवट म्हणतात. त्यांच्या श्रमाला पूर्ण मान-सन्मान देतात. केवट राम राज्यातील प्रथम नागरिक होतो.
 
राम त्रेता युगाची संपूर्ण समाज व्यवस्थेच्या केंद्रात आहे, हे सिद्ध करण्याची गरज नाही. त्याचं स्थान समाजता उंच करणे आहे. रामाचे संघर्ष आणि विजय या प्रवासात त्याच्या समुदायाला मोठेपण देतात. त्रेताच्या संपूर्ण समाजात केवटची प्रतिष्ठा करतात.