बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (08:14 IST)

महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा शेअर बाजारावर परिणाम होणार? किती आणि कसा?

कोरोनाचा झपाट्याने होणारा फैलाव लक्षात घेता महाराष्ट्रात १५ दिवसांसाठी अत्यंत कडक निर्बंध जाहीर केले आहेत. राज्य सरकारच्या या निर्बंधांचा आर्थिक दुष्परिणाम होईल, तसेच शेअर बाजार सुरू होईल तेव्हा त्याचा मोठा परिणाम होईल, अशी शक्यता आहे. परंतु काही अर्थतज्ज्ञांनी मात्र स्टॉक मार्केटवर या निर्बंधांचे दुष्परिणाम होणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
 
सीएनआय रिसर्च सीएमडी किशोर ओस्तवाल यासंदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले की, महाराष्ट्रात लागू केलेल्या कठोर बंदीचा बाजारावर मोठा परिणाम होईल आणि  बाजार सुरू होताच मोठी घसरण होईल हे असे समजले असले तसे काही होणार नाही. सुमारे १५ दिवस कलम १४४ आणि रात्री कर्फ्यूसह अनेक कडक निर्बंध राज्यभर लागू राहतील. त्यामुळे शेअर बाजारातील दुर्घटना अनिश्चिततेच्या परिस्थितीत दिसून येते.
 
ओस्तवाल पुढे म्हणाले की, गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात लॉकडाऊन असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, त्यावेळी तेजी दिसून आली.  लॉकडाऊनच्या शक्यतेमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली होती.  महाराष्ट्रातील लॉकडाऊनवर शेअर बाजारातील संबंधीत घटकाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की राज्यात लॉकडाउन होणार नाही आणि यावर कडक निर्बंध लादले जातील, हे निश्चितच बाजारासाठी दिलासादायक आहे.
 
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री यांनी सध्या संपूर्ण लॉकडाउन लावला जाणार नाही, असे स्पष्ट केल्यामुळे शेअर बाजारात लॉकडाऊन संदर्भातील अनिश्चितता दूर झाली आहे, असे मत व्यक्त करीत ओस्तवाल यांनी आंशिक लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार नाही. सिंगापूर निफ्टीमध्येही तेजी पाहायला मिळाली.  त्याचबरोबर गुरुवारीही मुदत संपत आहे, त्यामुळे बाजारात तेजी दिसून येईल.
 
भारतात ११ कोटी लोकांना लसी देण्यात आली असून येत्या काही दिवसांत देशात स्पूटनिकला दररोज सुमारे १० दशलक्ष लस उत्पादन देईल. पुढील दहा दिवसांत ही लस वापरली जाईल. अशा प्रकारे, ६० दिवसात ५०-६० दशलक्ष लोकांना लसी दिली जाईल. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना लसीकरणानंतर परिस्थिती आपोआपच नियंत्रणात येईल, असे म्हटले जाते. त्यामुळे शेअर बाजारावर अद्याप तरी चितेंचे सावट नसल्याचे दिसून येत आहे.