जप, ध्यान आणि श्लोकांचा वैज्ञानिक फायदा
दैनंदिन जीवनात प्रत्येकाला शांतात प्रिय असते धावपळीच्या या जीवनात व्यक्ती शांतता शोधत असतो तसेच जप, ध्यान आणि श्लोक यांना खूप महत्व आहे हिंदू धर्मामध्ये यांचे विशेष महत्व सांगितले आहे पण तुम्हाला माहित आहे का? जप, ध्यान आणि श्लोक यांचे वैज्ञानिक फायदे देखील आहे जे मनाला शांतता देतात व ज्यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य देखील सुधारते
जप, ध्यान आणि श्लोकांचे वैज्ञानिक फायदे
जप (Chanting)
तणाव कमी करणे-जप करताना नियमित श्वासोच्छवास आणि मंत्रांचा उच्चार तणाव हार्मोन (कोर्टिसोल) कमी करतो.
मेंदूची कार्यक्षमता- संशोधनात दिसून आले की मंत्रोच्चाराने मेंदूच्या अल्फा लहरी वाढतात, ज्यामुळे एकाग्रता सुधारते.
हृदयाचे आरोग्य- जपाचा गजर रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवतो.
ध्यान (Meditation)
मानसिक शांती- ध्यानामुळे मेंदूतील ग्रे मॅटर वाढते, जे चिंता आणि उदासीनता कमी करते.
रोगप्रतिकारक शक्ती- नियमित ध्यानाने रोगप्रतिकारक प्रणाली मजबूत होते, ज्यामुळे आजारांपासून संरक्षण मिळते.
निद्रा सुधारणा-ध्यानामुळे झोपेची गुणवत्ता वाढते आणि अनिद्रा कमी होते.
श्लोक (Chanting Verses)
स्मरणशक्ती- श्लोकांचे पाठांतर आणि उच्चार स्मरणशक्ती आणि मेंदूच्या संज्ञानात्मक कौशल्यांना उत्तेजन देतात.
भावनिक स्थिरता-श्लोकांचे अर्थ समजून घेणे आणि त्यांचा अर्थ आत्मसात करणे भावनिक संतुलन साधते.
ऑक्सिटोसिन वाढ-सकारात्मक श्लोकांचा उच्चार ऑक्सिटोसिन (सुखाचे हार्मोन) चा स्तर वाढवतो.
या फायद्यांचे समर्थन अनेक वैज्ञानिक अभ्यासांनी केले आहे. नियमित सरावाने हे परिणाम अधिक प्रभावी होतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik