शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (14:52 IST)

भारत बंद दरम्यान सिंघू सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू,त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले

शेतकरी भारत बंद दरम्यान दिल्ली-हरियाणाच्या सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.मात्र,दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांनी म्हटले आहे की, शेतकऱ्याच्या मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदनानंतरच कळेल. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली देशभरातील 40 हून अधिक शेतकरी संघटनांनी आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. 
 
शेतकरी संघटनांनी सकाळी 6 ते दुपारी 4 पर्यंत हा भारत बंद पुकारला आहे,ज्या अंतर्गत सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालये,संस्था,दुकाने आणि उद्योग बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तथापि, शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की रुग्णालये,मेडिकल स्टोअर्स इत्यादी सर्व अत्यावश्यक सेवा त्यांचे काम चालू ठेवू शकतात.भारत बंदमुळे अनेक ठिकाणी भीषण वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. 
 
शेतकऱ्यांच्या भारत बंदला काँग्रेस, आम आदमी पार्टी, बसपा,सपा,वायएसआर काँग्रेस,डाव्या पक्षांसह अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. 
 
संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी करून दावा केला आहे की, त्यांनी पुकारलेल्या भारत बंदला अभूतपूर्व पाठिंबा मिळाला आहे. संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे की, पंजाब, हरियाणा, केरळ, बिहारमध्ये पूर्ण बंद आहे.