शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जानेवारी 2019 (18:13 IST)

आता कामाला लागा, पुन्हा एकदा आमचे सरकार येईल

‘भाजपाने ११ आणि १२ तारखेला राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत आयोजित केले होते. त्यामध्ये भाजपाचे सर्व मंत्री तसेच देशातील भाजपाचे सर्व नेते असे एकूण १२ हजार लोक एकत्र आले होते. देशात बहुमताने पुन्हा एकदा आमचे सरकार येईल यासाठी आमचे कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत. २०१३-१४ च्या परिस्थितीला बदलून आज भाजपने भारतात एक वेगळी उंची गाठली आहे. देशाची अर्थव्यवस्था आज सक्षम झालेली आहे. आज देशात प्रत्येकाला वीज मिळत आहे. आज साडेनऊ करोड शौचालय बनले आहेतअसे  रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. ६ करोड गरिबांना मोफत कुकिंग गॅस दिले. आज देशात फक्त २ ते अडीच करोड लोकांना फक्त मोफत गॅस देण्याचे शिल्लक राहिले आहे. आयुष्यमान भारतच्या माध्यमातून ५० करोड लोकांना फायदा होत आहे.’

गोयल यावेळी म्हणाले की, ‘देशातल्या प्रत्येकाला चांगलं आरोग्य मिळेल. या पाच वर्षात लोकांना भ्रष्टाचार मुक्त सरकार मिळेल. एका कुटुंबाने फक्त ५० वर्ष भ्रष्टाचार केला पण पारदर्शीपणे लोकांना लाभ पोहोचेल असे काम आम्ही केले आहे असे सांगितले.