1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बिहारमध्ये भीषण पूर, २५३ जणांचा बळी

मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये भीषण अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे आतापर्यंत २५३ जणांचा बळी गेला आहे. बिहारमधील तब्बल सव्वाकोटी लोकसंख्या एकटवलेल्या २० जिल्ह्यांना या पुराचा मोठा फटका बसला आहे.  अररिया जिल्ह्यात सर्वाधिक भीषण पूर परिस्थिती आहे.
 
बिहारच्या सीमावर्ती भागात आणि नेपाळमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे किनारी भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून बचावकार्य जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पूराचा वेढा पडलेल्या गावांमधून तब्बल ४.६४ लाख लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. तसेच या पूरग्रस्तांच्या सोयीसाठी १,२८९ मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तब्बल ३.९२ कोटी लोकांनी आसरा घेतला आहे.