रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (12:19 IST)

नवरा-बायकोमध्ये किरकर, तिन्ही मुलांना विष देऊन दंपतीने गळफास लावला

हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील औरंगाबाद गावात एकाच कुटुंबातील 5 जणांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पलवल येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. या घटनेनंतर कुटुंबात शोककळा पसरली होती. त्याचबरोबर परिसरात उदास वातावरण होते.
 
असे सांगितले जात आहे की पती -पत्नीमध्ये काही मुद्द्यावरून भांडण झाले, त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. या पाच जणांचे मृतदेह बुधवारी सकाळी कुटुंबप्रमुखाला सापडले. त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाचा तपास सुरू केला. मृतांमध्ये पती -पत्नी आणि 3 मुलांचा समावेश आहे. पती पत्नीला गळफास लावला तर मुलांना विष देण्यात आल्याचे समजते.