शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जून 2022 (13:43 IST)

राजस्थानचा विजय कुमार कुलगाममध्ये टार्गेट किलिंगचा बळी, सीएम गेहलोत केंद्र सरकारवर भडकले

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या राजस्थानच्या एका रहिवाशाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येचा निषेध करत, केंद्र सरकार तेथे शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरले आहे असे म्हटले. यासोबतच गेहलोत म्हणाले की, दहशतवाद्यांकडून आमच्या नागरिकांची अशी हत्या खपवून घेतली जाणार नाही.
 
गेहलोत यांनी कू केले की, "जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे कार्यरत असलेले राजस्थानमधील हनुमानगड येथील रहिवासी श्री विजय कुमार यांची दहशतवाद्यांनी केलेली हत्या अत्यंत निषेधार्ह आहे. त्यांच्या आत्म्याला शांती आणि त्यांच्या कुटुंबियांना धैर्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
 
एनडीए सरकार काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारने काश्मीरमधील नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करावी. दहशतवाद्यांकडून आमच्या नागरिकांची अशी हत्या खपवून घेतली जाणार नाही.
 
Koo App
जम्मू कश्मीर के कुलगाम में कार्यरत हनुमानगढ़, राजस्थान के निवासी श्री विजय कुमार की आतंकियों द्वारा हत्या घोर निंदनीय है। मैं ईश्वर से उनकी आत्मा की शांति एवं परिवार को हिम्मत देने की प्रार्थना करता हूं। NDA सरकार कश्मीर में शांति बहाल करने में असफल रही है। केन्द्र सरकार कश्मीर में नागरिकों की सुरक्षा सुनिश्चित करे। हमारे नागरिकों की इस तरह आतंकियों द्वारा हत्या बर्दाश्त नहीं की जाएगी।
 
- Ashok Gehlot (@gehlotashok) 2 June 2022
उल्लेखनीय आहे की, जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी स्थानिक देहाती बँकेच्या कर्मचाऱ्याचा विजय कुमार या बँकेच्या आवारातच गोळ्या झाडल्या. त्याला रुग्णालयात नेले जात होते, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.