संबंधित माहिती
- राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर भाजप-मनसे युती होणार का?
- लोकल प्रवास सुरु करण्यासाठी भाजपचं आज मुंबईत ट्रेन भरो आंदोलन
- भाजप आणि मनसे जाहीर युती करणार का?
- अमृता फडणवीसांना कामं नाहीत,भाजपने त्यांना प्रवक्त्या करावं
- 'ओबीसी आरक्षणा शिवाय स्थानिक निवडणुका होऊ देणार नाही', महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली
भाजप शिवसेनेचा कायमचा शत्रू आहे असे नाही : नीलम गोऱ्हे
राजकारणात कायमचे कोणी कोणाचे शत्रू नसते, आज भाजपशी केवळ मतभेद असले तरी तो पक्ष शिवसेनेचा कायमचा शत्रू आहे असे नाही. या पक्षांच्या युतीबाबत मी बोलत नाही, मात्र भविष्यात काय होऊ शकते सांगता येत नाही, असे वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी जळगावात केले. या सोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीतून ते एकत्रदेखील येऊ शकतात, मात्र कार्यकर्त्यांचे काही खरे वाटत नाही, असेही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
भाजप व शिवसेना यांची पुन्हा युती होऊ शकते का, या विषयावर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, या विषयी पक्षप्रमुख, प्रवक्ते बोलतील. मात्र ज्या वेळी या दोन्ही पक्षाची युती होती, त्या वेळी मीदेखील समन्वय समितीमध्ये होते. ही युती का तुटली, ज्या मुद्यावर मतभेद झाले याकडेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे. युतीच्या वेळी जे ठरले त्यात विश्वासघात झाल्याने आम्ही इतर पक्षांकडे वळलो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील लेख
