संबंधित माहिती
- आणखी बारा शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र : अंबादास दानवे
- मुंबईमध्ये मुजोर टॅक्सी चालकांविरोधात तक्रार करणे आता प्रवाशांना झाले सोप्पे
- चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात,ही कौटुंबिक भेट होती, राज आमच्या मोठ्या भावासारखे आहेत
- मनसेने शिवसेना-शिंदे गटाला दसऱ्याच्या मेळाव्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली
- Rain Update: मुंबई पुण्यासह या जिल्ह्यात पावसाची शक्यता
घरात बसून मुख्यमंत्रीपद हाताळता येत नाही : नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. घरात बसून मुख्यमंत्रीपद हाताळता येत नाही. अडीच वर्षात महाराष्ट्र किमान दहावर्ष मागे गेला आहे. त्यामुळे हे सरकार गणरायाच्या कृपेने गेलं आणि गणरायाच्या कृपेने भाजप-शिंदे गटाचं सरकार आलं आहे. महाराष्ट्रासह भारतीय जनता पार्टीची केंद्रात सत्ता आहे. त्यामुळे राज्य सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करेल असा मला विश्वास आहे, असं नारायण राणे म्हणाले.
दसरा मेळावा कुणाचा आणि आवाज कुणाचा?, यावरून रणकंदन सुरू आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नारायण राणे म्हणाले की, आवाज कुणाचा याला उत्तर मिळालेलं आहे. त्यांचं सरकार तर गेलंय म्हणजे आवाज गेला. शिवसेना कुठेय आणि त्यांच्याकडे किती आमदार आहेत. शिंदे गटात ४० पेक्षा जास्त आमदार गेले आहेत. उरलेले लवकरच जातील. त्यामुळे शिवसेना आणि ठाकरे यांचं काही अस्तित्व राहिलेलं नाहीये, असं नारायण राणे म्हणाले.
पुढील लेख
