1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (11:39 IST)

राज्यात सुरू होणार मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना

राज्यातल्या गावात शेतरस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी 'मातोश्री ग्राम समृद्धी शेत - पाणंद रस्ते योजना' राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.
 
राज्यात शेत, पाणंद रस्ते योजना राबवताना येणाऱ्या अडचणी दूर करून यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो योजनांचं एकत्रीकरण करण्यात येणार आहे.
 
यातून मनरेगामध्ये होणाऱ्या विविध कामांमधील अकुशल व कुशलच्या संयोजनातून शेत-पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेला 'मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना' असं नाव देण्यात आलंय.
 
राज्यात 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते याद्वारे बांधण्यात येणार आहेत.