1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (12:58 IST)

राज्याच्या काही भागात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट, काळजी घेण्याचे आव्हान

summer temperature
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात कमालीची वाढ होत असताना दिसत आहे. अशातच मराठवाडा, विदर्भात सध्या तापमानात वाढ होत असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या अनेक भागात तापमान 40च्या पार गेले असताना पुढचे काही दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
 
पुढचे दोन दिवस मराठवाड्यात तर विदर्भात पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट असणार आहे. तर मध्य महाराष्ट्रात देखील पुढचे दोन ते दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
 
येत्या 48 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट तर दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
 
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र शुक्रवारी वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला गेला आहे. 
 
दरम्यान मागील काही दिवस पुण्यातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस आणि त्या आसपास होते. परंतु बुधवारी 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर 6 एप्रिल रोजी अकोला येथे सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
 
दरम्यान, महाराष्ट्रासह राजस्थान, दक्षिण हरियाणा-दिल्ली, पंजाब, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यात देखील उष्णतेच्या लाटेची परिस्थिती असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.