1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 मार्च 2023 (09:40 IST)

भटके कुत्रे आसामला पाठवा, बच्चू कडूंचा राज्य सरकारला सल्ला

bachhu kadu
राज्यातील भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हे कुत्रे आसामला पाठवावेत, तिथे भटक्या कुत्र्यांचं मांस खाल्लं जातं, तिथे कुत्रे 8 ते 9 हजारांना विकले जातात, असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे.
 
विधानसभेत शुक्रवारी (3 मार्च ) भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर आमदार प्रताप सरनाईक, आमदार अतुल भातखळकर, आमदार सुनील टिंगरे यांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
 
भटक्या कुत्र्यांबाबत सुरु असलेल्या लक्षवेधीवर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, खरे तर भटक्या कुत्र्यावर सोप्पा इलाज आहे. पाळीव कुत्रे रस्त्यांवर येत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याच्यावर समिती नेमण्यापेक्षा कृती योजना जाहीर करायला हवी. एखाद्या शहरात तसा प्रयोग करण्यात यावा.
 
“रस्त्यांवर असलेल्या भटक्या कुत्र्यांना उचलून आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये कुत्र्यांना किंमत आहे. आठ ते नऊ हजार रुपयांना कुत्रे विकले जातात. आम्ही गुवाहाटीला गेल्यावर तिथे कळलं, जसं आपल्याकडं बोकडाचं मांस खाल्लं जातं. तसे, तिकडे कुत्र्यांचं मांस खाल्लं जातं,” असं बच्चू कडूंनी सांगितलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.

Published By -Smita Joshi