शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (17:30 IST)

आजपासून रोज ही एक गोष्ट जाळायला सुरुवात करा, पैशांचा पडेल पाऊस

हिंदू धर्मानुसार लवंग अत्यंत शुभ मानली जाते. याचा उपयोग हिंदूंच्या पूजेदरम्यानही केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की जर घरामध्ये रोज लवंग जाळल्या तर जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. अशा परिस्थितीत या बदलांची जाणीव असणे गरजेचे आहे. आजचा लेख याच विषयावर आहे. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दररोज लवंग जाळल्याने कोणते बदल होऊ शकतात.  
 
लवंग जाळल्यावर काय होते?
रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात कापूर टाकून लवंग जाळल्यास धनाची कमतरता भासत नाही. यासोबतच अचानक पैसे मिळण्याचे मार्गही मोकळे होतात.
तुमच्या घरातील कोणी आजारी असेल किंवा कोणी अस्वस्थ वाटत असेल तर रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी लवंग जाळून टाका. असे केल्याने सदस्यांना आजारांपासून मुक्ती मिळते.
 
घरामध्ये कलह वाढत आहे, कुटुंबातील लोकांमध्ये दुरावा निर्माण होत असेल तर  मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 5 लवंगा आणि कापूर जाळावा. घरात लवंग टाकूनही कलह आणि त्रास दूर होतो.
 
जर तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळवायचे असेल किंवा तुम्हाला काम मिळत नसेल तर अशा परिस्थितीत घरात लवंग जाळून टाका. त्यामुळे नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. जर तुम्हाला मानसिक समाधान मिळवायचे असेल तर रोज घरात लवंग जाळल्याने ही इच्छा पूर्ण होऊ शकते. 
Edited by : Smita Joshi