विद्यार्थ्याची आत्महत्या
बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने थेरगाव येथील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (बुधवारी) घडली आहे.
संजय दत्तात्रय विभुते (वय-18,रा. भोरडे नगर थेरगाव , पुणे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
संजय विभुते याने काल बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल पाहिला व तो घरी आला. त्यानंतर त्याने स्वत:ला एका खोलीत बंद केले आणि गळफास घेत आत्महत्या केली.