शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 जून 2022 (15:03 IST)

वीज पडून 3 शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

bijali
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पाळज शिवारात मंगळवारी सायंकाळी वीज पडून 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
 
हे शेतकरी शेतात पेरणीची तयारी करत असताना वीज पडल्याची घटना घडली. साईनाथ सातमवार (वय ३०), राजेश्वर चटलावार (४०) व बोजना रामनवार (३२), अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.
 
खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली होती. साईनाथ सातमवार, राजेश्वर चटलावार, बोजना रामनवार हे शेतकरी शेतामध्ये पेरणी करत असताना सायंकाळच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि विजांचाही कडकडाट सुरू झाला. दरम्यान अचानक वीज कोसळल्याने तिन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.