गुंदवली-कापूरबावडी-भांडुप संकुल भूमिगत जलबोगद्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.आमच्या दोघांच्या म्हणजेच युतीच्या कारभावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे मागील 20 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीचा भगवा फडकत असल्याचे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, युतीचं सरकार विकासाची कामं करत आहे.जनता आता बघतेय कोण काम करय आणि कोण बंदुका काढत आहे.