शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (15:57 IST)

गंगाजल आहे अमृतसमान, केवळ स्पर्शानेच मिळते पुण्य

Ganga river
गंगाजल हे अमृत मानले जाते. गंगाजलाच्या शुद्धतेचा अंदाज यावरून लावता येतो की लोक गंगाजल हातात घेऊन वचन घेतात आणि शेवटच्या क्षणी गंगाजलाचा एक थेंब तोंडात टाकल्यास त्याला स्वर्गप्राप्ती होते, असे मानले जाते. असे मानले जाते की गंगेच्या पाण्याला स्पर्श केल्याने दुःखांपासून मुक्ती मिळते. घरात गंगाजल ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
 
गंगेच्या पाण्याच्या नुसत्या स्पर्शाने मोक्षाचा मार्ग खुला होतो असे शास्त्रात सांगितले आहे. गंगाजल पूज्य आहे त्यामुळे ते नेहमी मंदिरात किंवा पूजास्थळी ठेवावे. घरामध्ये संकटाची परिस्थिती असल्यास, दररोज सकाळी स्नान आणि पूजा केल्यानंतर संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडा. 
 
जर मुलावर वाईट नजर असेल तर त्याच्यावर गंगाजल शिंपडा. घरामध्ये सारखे सारखे कोणी आजारी होत असेल तर घराच्या उत्तर-पूर्व दिशेला पितळेच्या भांड्यात गंगाजल भरून ठेवावे. दर सोमवारी भगवान शिवाचा गंगाजलाने अभिषेक करा. 
 
दर शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळांना गंगाजल मिश्रित जल अर्पण करा. रात्री भयानक स्वप्न पडत असल्यास झोपण्यापूर्वी पलंगावर गंगेचे पाणी शिंपडा. गंगाजल अर्पण केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात. 
 
जर मुलाला अभ्यासात आवडत नसेल तर बुधवारी गणपतीची पूजा करा. तसेच मुलाच्या खोलीत आणि अभ्यासाच्या खोलीत गंगाजल शिंपडा. घरातील लोक रागावले असतील तर त्यांच्यावर गंगाजल शिंपडा. यामुळे मनाला शांती मिळेल. गंगाजलाच्या नियमित सेवनाने आजारांचा धोका कमी होतो.