शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

पायात घालू नये सोन्याचे दागिने, वाईट परिणाम होतात

सोन्याचे दागिने घालण्याचा शौक स्त्रियांचा नव्हे तर पुरुषांना देखील असतो. परंतू काय आपल्याला हे माहीत आहे का की सोनं कधी पायात घालू नये. 
 
स्वर्ण म्हणजे सोनं गुरु ग्रहाची धातू मानले जाते. ज्यांच्या पत्रिकेत गुरु ग्रह चांगल्या स्थिती असतो त्यांनी आविष्यभर सोन्याचे दागिने घालण्याची संधी मिळत असते. अशा लोकांना कधी पेश्याची कमी भासत नाही. परंतू शास्त्रांप्रमाणे सोन्याचे दागिने कधीही पायात घालू नये. याने गुरु ग्रहाचे वाईट परिणाम जाणवतात.
 
असेच सोन्याच्या दागिन्याचं हरवणे किंवा रस्त्यावर सापडणे शुभ मानले जात नाही. सोनं हरवणे आणि सापडणे अशुभ असतं. सोन्याची वस्तू हरवण्याने वाद, क्लेश आणि आजार होण्याची शक्यता असते. याचा अर्थ ग्रहांच्या वाईट परिणाम सुरू झाला आहे. या व्यतिरिक्त कोणाचे हरवलेले दागिने आपल्याला मिळून ते आपण घरात ठेवले तर याने खर्च वाढतं. अशुभ बातमी कळू शकते.