सोलापूर लोकसभेचा इतिहास
बी.ए. मुल्ला
WD |
प्रामुख्याने काँग्रेसची सत्ता असल्याने तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी विकासकामाअंतर्गत अनेक योजना राबविल्या. त्यामध्ये प्रामुख्याने संस्थानिकांचे तनखे रद्द, बँक राष्ट्रियीकरण, गरिबी हटाव, कुटुंबनिोजन वगैरे. काँग्रेसपक्षातीलच एक गट इंदिराजींच्या या कार्यपद्धतीवर नाराज होऊन विरोधात गेला व पक्षात सिंडीकेट व इंडिकेट असे दोन गट पडले. हे सर्व घडत असताना 1970 साल उजाडले. विरोधकांच्या आव्हानामुळे इंदिराजींनी 1971 साली लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या व नियमाप्रमाणे 1972 ला लोकसभेच्या निवडणुका होण्याऐवजी 1971 ला मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या. ही 1971 ची सोलापूर लोकसभेची निवडणूक अतिशय अटीतटीची व चुरशीची झाली कारण यावेळेला काँग्रेसचे उमेदवार सूरजरतन दमाणी हे अतिशय धनाढय़ व मिल मालक होते. त्यांच्या विरोधात दैनिक संचारचे तत्कालीन संपादक रंगाअण्णा वैद्य यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले. ही 1971 ची लोकसभा निवडणूक अतिश रोमहर्षक ठरली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. रंगाअण्णांना सोलापूर मतदारसंघात ग्रामीण व शहरी भागातून सर्व थरातून भरघोस पाठिंबा मिळत होता. मात्र दमाणींचा यावेळी निसटता विजय झाला व लोकनायक रंगाअण्णा अल्पमताने पराभूत झाले. मात्र रंगाअण्णांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर आला आणि एक रोमहर्षक इतिहास निर्माण झाला.
WD
त्यानंतर 1985च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सोलापुरातीलच्या धर्मण्णा सादूल हे निवडून आले व नंतर राजीव गांधींच्या निधनामुळे 1991 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव होऊन भारतीय जनता पक्षाचे लिंगराज वल्याळ निवडून आले. त्यानंतर 1995 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे निवडून आले. त्यानंतर मात्र देशपातळीवर काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर 1999 साली झालेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आनंदराव देवकते, राष्ट्रवादीचे अरळप्पा ऊर्फ मुकेश अब्दुलपूरकर व भारतीय जनता पक्षाचे प्रतापसिंह मोहिते-पाटील असा तिरंगी सामना झाला आणि त्यामध्ये भा.ज.प. चे प्रतापसिंह मोहिते पाटील निवडून आले. त्यानंतर पाच वर्षानी झालेल्या 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्ंमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वलाताई शिंदे या काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून भा.ज.प.चे सुभाष देशमुख निवडून आले. त्यानंतर 5 वर्षानी 2009 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी भा.ज.प.चे शरद बनसोडे यांचा प्रचंड मतांनी पराभव केला आणि ते केंद्रात मंत्री झाले. सध्या ते भारताचे गृहमंत्री आहेत.
इतिहासाचे पृथक्करण केले असता सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये 1962 व 1967 या दोन निवडणुका सोडल्यानंतर 1971 च्या निवडणुकीमध्ये रंगाअण्णा वैद्य यांच्या रूपाने अभिव्यक्ती स्वातंत्रची जागरुकता निर्माण झाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
