1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|
Last Modified: सिंगापूर , शनिवार, 30 मे 2009 (20:58 IST)

विश्वकरंडकचा भारत दावेदार: ‍सचिन

आक्रमक फलंदाजी आणि जागतिक स्तरावरील खेळाडूंमुळे भारतीय संघ टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या विजेतेपदाचा दावेदार आहे, असे मत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले.

सिंगापूरला एका कार्यक्रमानिमित्त आलेला सचिन म्हणाला,' विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ सर्वात संतुलित आहे. यामुळे यावेळीही भारत विजेतेपदाचा दावेदार आहे. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांचा हरविलेला सूर हा चिंताचा विषय आहे. परंतु स्पर्धेदरम्यान ते चांगली कामगिरी करतील.'