शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (10:52 IST)

1666 मध्ये फळांच्या टोपलीत लपून शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर आले होते

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला होता. ते महानायक होते. छत्रपती शिवाजींच्या वाढत्या सामर्थ्याने चिंतित मुघल बादशाह औरंगजेबने दक्षिणेत नियुक्त केलेल्या आपल्या सुभेदाराला त्याच्यांवर हल्ला करण्याचा आदेश दिला.पण सुभेदारला तोंडाची खावी लागली. छत्रपती शिवाजींबरोबरच्या लढ्यात त्याने आपला मुलगा गमावला आणि स्वतःच त्याची बोटं कापली गेली. त्याला मैदान सोडून पळून जावे लागले.या घटनेनंतर औरंगजेबाने आपल्या सर्वात प्रभावशाली सेनापती मिर्झा राजा जयसिंग यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 100,000 सैनिकांची फौज पाठवली.
 
श्रीमंत छत्रपती शिवाजींना चिरडून टाकण्यासाठी राजा जयसिंगने बीजापुरच्या सुल्तानशी संधी गाठत पुरंद‍र किल्ला
आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रथम योजनते 24 एप्रिल 1665 रोजी 'व्रजगढ' किल्ला ताब्यात घेतला. पुरंदर किल्ल्याचे रक्षण करताना श्रीमंत छत्रपती शिवाजींचा अत्यंत शूर सेनापती 'मुरारजी बाजी' मारला गेला.पुरंदरचा किल्ला वाचवण्यासाठी महाराजांनी महाराजा जयसिंगसोबत एक करार केला. दोन्ही नेत्यांनी कराराच्या अटींवर सहमती दर्शविली आणि 22 जून 1665 रोजी 'पुरंदरचा करार' संपन्न झाला.
 
सुरक्षेचे पूर्ण आश्वासन मिळाल्याने छत्रपती शिवाजी आग्र्याच्या दरबारात औरंगजेबाला भेटण्यास तयार झाले. ते 9 मे 1666 रोजी आपला मुलगा छत्रपती संभाजी आणि 4000 मराठा सैनिकांसह मुघल दरबारात हजर झाले, परंतु औरंगजेबाकडून योग्य आदर न मिळाल्याने छत्रपती शिवाजींनी औरंगजेबाला भरलेल्या दरबारात 'विश्वासघातकी' म्हटले, परिणामी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी आणि त्यांच्या  मुलाला 'जयपूर भवनात' कैद केलं. तिथून छत्रपती शिवाजी 13 ऑगस्ट, 1666 रोजी फळांच्या टोपलीत लपून पळून गेले आणि 22 सप्टेंबर 1666 रोजी रायगडावर पोहोचले होते.