संबंधित माहिती
- भाजी जास्त तिखट झाल्यास तिखटपणा कमी करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
- पावसाळ्यात कारले खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
- पावसाळ्यात शेव-फरसाण नरम पडून चव बिघडते याकरिता अवलंबवा या सोप्या टिप्स
- रात्री जेवणात बनवा स्वादिष्ट भरलेल्या कारल्याच्या भाजी
- या भाज्या सालींसह खाल्ल्याने शरीराला मिळतात हे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
भाजी बनवल्यानंतर त्यात हा आंबट पदार्थ घाला; उत्तम चव येईल
आंबटपणा भाजीची चव अधिकच वाढवते, समृद्धता आणि ताजेपणा दोन्ही वाढवते. आज आम्ही तुम्हाला अशा काही भाज्याबद्दल सांगणार आहोत ज्यात थोडासा आंबटपणा घातल्यानंतर चव अधिक स्वादिष्ट बनते.
वांग्याची भाजी किंवा भरीत
वांग्याची भाजी किंवा भरीत मध्ये आमसूल पावडर किंवा थोडासा लिंबाचा रस घालावा.
वांगी थोडी जड आणि मऊ असल्याने, आंबटपणा त्याची चव हलकी आणि मसालेदार बनवतो.
मेथीची भाजी
मेथीच्या भाजीमध्ये आंबट दही किंवा टोमॅटो घालावा. यामुळे भाजीला आणखीन चव येते.
बटाटा-टोमॅटोची भाजी
बटाटा-टोमॅटोची भाजीला टोमॅटो फक्त आंबटपणा देतात, कधीकधी लिंबाचा रस देखील घालावा. छान चव येते.
भेंडीची भाजी
भेंडीची भाजावी केल्यानंतर त्यामध्ये आमसूल पावडर किंवा लिंबाचा रस घालावा. भेंडी चिकट असल्याने, आंबटपणा त्याला कोरडे आणि कुरकुरीत बनवण्यास मदत करतो.
ALSO READ: या भाज्यांमध्ये जिरे घालू नये; चव खराब होते
आलू मटरची भाजी
आलू मटरची भाजी केल्यांनतर त्यामध्ये आमसूल पावडर किंवा लिंबाचा रस घातल्याने मटार आणि बटाटे दोघांनाही चव यते, आंबटपणा चव वाढवतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
