शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (19:30 IST)

हवेतच विमानाचे इंजिन बंद

शुक्रवारी एअर इंडियाच्या विमानाचे इंजिन हवेतच बंद पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने वैमानिकाने वेळेत विमान पुन्हा उंच विमानतळावर उतरवले. टाटा समूहाद्वारे चालवलेले एअर इंडियाचे एअरबस A320neo विमान उड्डाणानंतर अवघ्या 27 मिनिटांत मुंबई विमानतळावर परतले कारण त्यातील एक इंजिन तांत्रिक समस्येमुळे रखडले होते.  
 
 एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गुरुवारी प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी बेंगळुरूला दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान वाहतूक नियामक डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन या घटनेची चौकशी करत आहे. एअर इंडियाच्या A320neo विमानांमध्ये 'CFM'लीप इंजिन बसवलेले आहेत.
 
A320neo विमानाच्या पायलटला सकाळी 9:43 वाजता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर इंजिनमध्ये बिघाड झाल्याची सूचना मिळाली. सूत्रांनी सांगितले की, इंजिन बंद झाल्यानंतर विमान सकाळी 10.10 वाजता मुंबई विमानतळावर परतले.
 
या घटनेबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्याला विचारले असता ते म्हणाले, “एअर इंडिया सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. आमचा क्रू या परिस्थिती हाताळण्यात पारंगत आहे. आमच्या अभियांत्रिकी आणि देखभाल पथकांनी तत्काळ तपास सुरू केला आहे.