गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (16:27 IST)

तीन एसएसबी जवानांचा विजेचा धक्का लागून मृत्यू, 8 जण गंभीर होरपळले

बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील एसएसबीच्या 45 व्या बटालियनच्या वीरपूर कॅम्पमध्ये शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. विजेच्या धक्क्याने तीन प्रशिक्षणार्थी जवानांचा मृत्यू झाला तर आठ जण होरपळून जखमी झाले. यापैकी चार जखमींना रेफर करण्यात आले आहे. अपघातानंतर छावणीत गोंधळाचे वातावरण पसरले आहे. 
प्राथमिक माहितीनुसार, 45 व्या बटालियनचे कमांडंट यांच्या बदलीच्या सन्मानार्थ बुधवारी सायंकाळी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता प्रशिक्षणार्थी जवान टेन्ट  काढताना. दरम्यान, मंडपावरून जाणाऱ्या हायव्होल्टेज वायरमध्ये अॅल्युमिनियमचा पाइप अडकला. सर्व जवान एकाच ठिकाणी काम करत असल्याने एकाच वेळी अनेक जण विद्युत प्रवाहाच्या तडाख्यात आले. आणि त्यांना विजेचा धक्का बसला. 
यामध्ये महाराष्ट्रातील रहिवासी अतुल पाटील (30 वर्षे), परशुराम साबर (24 वर्षे) आणि महेंद्र चंद्रकुमार बोपचे (28 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी जवान नरसिंग चौहान, के चंद्रशेखर, परितोष अधिकारी, मांडवे राजेंद्र मोहम्मद शमशाद, सुकुमार वर्मा, सोना लाल यादव आणि आनंद किशोर यांना उपविभागीय रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर चार जखमी जवानांना रेफर करण्यात आले आहे. सध्या शिबिरातील एकही अधिकारी काहीही बोलण्यास असमर्थता व्यक्त करत आहे.