पोलिसांना आधुनिक शस्त्रांचे ‘बळ’
२६/११च्या दहशतवादी हल्लयाला आज सहा वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहताना पोलीस दल अत्याधुनिक शस्त्रांनी सक्षम करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री फडवणीस यांनी २६/११च्या दहशतवादी हल्लयातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यावेळी त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे होती त्यातुलनेत पोलीसांकडे शस्त्रांची कमतरता जाणवली होती. तरीही मोठ्या धैर्याने पोलीसांनी दहशतवाद्यांचा बिमोड केला होता.
या पार्श्वभूमीवर बोलताना राज्यातील पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रांनी सक्षम करू, असेही आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.