मंगळवार, 9 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 16 मे 2021 (10:18 IST)

सरकार आणि जनता बेफिकीर राहिल्यानेच कोरोनाची दुसरी लाट'- मोहन भागवत

The second wave of corona is due to the indifference of the government and the people '- Mohan Bhagwat
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जनता आणि सरकार जबाबदार असल्याचं सांगत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पहिल्या लाटेचा यशस्वी सामना केल्यानंतर सरकार आणि लोक बेफिकिर झाले असं मोहन भागवत म्हणाले.
पुण्यात 'पॉझिटिव्ह अनलिमिटेड' या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, 'आता मात्र लोकांना पॉझिटिव्ह राहूनच या संकटाला तोंड देणं गरजेचं आहे. कोव्हिड निगेटिव्ह राहण्यासाठी सावधान रहावं लागणार आहे. तसंच या परिस्थितीत तर्कहीन वक्तव्यं टाळायला हवीत. ही परीक्षेची वेळ असून सर्वांनी एकजूट रहायला हवं. एक टीम म्हणून काम करायला हवं.'
तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असताना त्याला घाबरून न जाता आपण स्वत:ला तयार केलं पाहिजे असंही मोहन भागवत म्हणाले.