1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

कर्मभूमी

बुद्धी व पुण्याने स्वर्ग प्राप्ती केलेल्या देवतांनाही ईश्वर दर्शनाचा लाभ नाही. कारण स्वर्ग केवळ भोगभूमी आहे. केलेल्या सकर्मामुळे स्वर्गप्राप्ती होते.      
ज्या डोक्यावर ईश्वरा ऐवजी अभिमान बसला आहे त्याचे जीवन दु:खी होते.

धन वैभव आणि अधिकार याने समाधान मिळत नाही. तर प्रेम, आनंद आणि समता या गोष्टी प्रभू दर्शनाने प्राप्त होतात. मनुष्य देहात ईश्वरप्राप्तीचे गुह्य आहे. पशु किंवा देवतांच्या शरीरात ईश्वर दर्शन करण्याचे सामर्थ्य नाही. पशू तर बिचारा अज्ञानीच आहे पण बुद्धी व पुण्याने स्वर्ग प्राप्ती केलेल्या देवतांनाही ईश्वर दर्शनाचा लाभ नाही. कारण स्वर्ग केवळ भोगभूमी आहे. केलेल्या सकर्मामुळे स्वर्गप्राप्ती होते.

दुसरे सर्त्म करणे किंवा पुण्य जमा करण्याची संधी स्वर्गात मिळत नाही. आपला भारत कर्मभूमी आहे. भारतात राहणारे मानव सत्संग, सत्कर्म आणि संकीर्तनाने प्रभूचे दर्शन घेऊ शकतात. म्हणूनच स्वर्गातील देवताही भारतभूमीवर जन्म घेण्यास उत्सुक असतात.