मकर संक्रांतनंतर येणार्या माघ शुध्द पंचमीला वसंत पंचमी अर्थात निसर्गाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जात असतो. वातावरणातील थंडी कमी होऊन वातावरण आल्हाददायक होते. निसर्ग सोळा कलांनी फुलून, बहरून येतो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर भारतात व राजस्थानात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. निसर्गाची सुंदरता आणि मानवाची रसिकता यांचा समन्वय भावमिलन व सुरेख संगम म्हणजे वसंत ऋतू होय.