एका जंगलात एक हत्ती मरून पडलेला एका कोल्ह्याला दिसतो. पण त्या हत्तीचे कातडे त्याला काही केल्या सोलता येत नव्हते. तेवढ्यात एक सिंह तिकडे आला तेव्हा कोल्ह्याने त्याला सांगितले की, ''आपल्यासाठीच हा हत्ती मारून ठेवलाय.'' पण सिंह कोल्ह्यावर खूष होऊन त्याला सांगतो, मी दुसर्याने मारलेला प्राणी कधीच खात नाही.... तूच खा तो हत्ती. सिंह निघून गेल्यावर थोड्यावेळातच वाघ येतो.
ND
ND
मेलेला हत्ती बघून वाघ खूष होतो. पण कोल्हा त्याला सांगतो, ''सिंहाने हा हत्ती मारून ठेवला आहे. मला राखण करायला सांगून नदीवर आंघोळीला गेला आहे. वाघ आला तर त्याला सांग की, हत्तीला हात लावशील तर जंगलातले सर्व वाघ मारून टाकीन!'' कोल्ह्याच्या या उद्गारावर वाघ पळून जातो.
तेवढ्यात वानर येतो. तेव्हा कोल्हा विचार करतो की याच्याकडूनच कातडे सोलून घेऊया. मग सिंहाची भीती घालून पळवून लावूया!
ND
त्याप्रमाणे वानराला कोल्हा सांगतो की, ''वानरा बरेच दिवसांनी भेटताय! पण भुकेलेला दिसताय. हत्तीचे मांस खा आणि जा! सिंहाने मारून ठेवलाय हत्ती.... तो गेलाय नदीवर तोपर्यंत खाऊन घे मांस. मी सिंह आला की तुला खूण करतो.... मग पळून जा.''
ND
ND
वानर कोल्ह्याच्या बोलण्यावर खूष होतो. संपूर्ण कातडे सोलून झाल्याचे लक्षात आल्यावर कोल्हा वानराला सिंह येतो आहे अशी खूण करतो. त्यासरशी वानर पळून जातो.
इकडे कोल्हा त्या मांसावर तुटून पडतो.
तात्पर्य : चतुरपणा आणि प्रसंगावधान अंगी असेल तर कठीण प्रसंगातही निभावता येते.