मुस्लिम समाजाने हिंदुत्व शक्तींविरुद्ध लढावे!
मुस्लिम समाजाने हिंदुत्व शक्तींविरुद्ध लढण्याची वेळ आली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केले आहे.
दादरी येथील प्रकार म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाने १९९२ साली बाबरी मशिद पाडल्यापेक्षा कमी नसल्याचेही सांगताना खान म्हणाले, देशाला हिंदू राष्ट्रामध्ये बदल करु इच्छिणार्या हिंदुत्व शक्तींविरुद्ध मुस्लिमांनी उभे राहून लढण्याची हीच वेळ आहे.