शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. मुस्लिम
  3. मुस्लिम धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जुलै 2020 (21:17 IST)

Eid-ul-Adha 2020 : ईद उल ज़ुहा किंवा बकरीद ईदचा सण का साजरा करतात जाणून घेऊ या..

Eid-ul-Adha 2020: जगभरात 31 जुलै किंवा 1 ऑगस्टला बकरीद ईद साजरी केली जाणार आहे. तथापि भारतात चांद ईद ला दिसून आल्यावर 1 ऑगस्टला साजरी करण्याची दाट शक्यता आहे. ईद उल अजहा किंवा ईद उल जुहा किंवा बकरीद ईद हा मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. ईद ही 3 प्रकाराची असते.
 
ईद अजहाच्या व्यतिरिक्त दोन ईद अजून आहे - ईद उल फीतर किंवा रमजान ईद आणि दुसरी ईद ला मिलादुन्नबी किंवा ईद ए मिलाद म्हणतात. पण ईद उल फीतर असो किंवा ईद ए अजहा किंवा ईद ए मिलाद असो या तिन्ही ईद आपापसातील बंधू प्रेमाचे, त्यागाचे, समर्पणाचे आणि मानवतेचा संदेश देतात. तिन्ही ईद सर्वांना एकत्ररीत्या राहण्याचा आणि सर्वांचं चांगलं करण्याची शिकवणी देतात.
 
ईद उल अजहाला अनेक नावाने ओळखतात. ईद ए अजहाला नमकीन ईद म्हणतात याला ईद ए करबां देखील म्हटलं जात. नमकीन ईद म्हणजे या दिवशी सर्व जिन्नस तिखट मिठाचे बनतात म्हणून नमकीन पक्वान्नाच्यासह हा सण साजरा केला जातो. कुर्बानीशी निगडित असल्यामुळे याला ईद ए कुरबां देखील म्हणतात. मुलं सामान्यतः याला बकरीद असेही म्हणतात.
 
सर्व साधारणपणे असे मानतात की या ईदचा संबंध बकरीशी आहे. वास्तवात,' बकर' म्हणजे मोठा प्राणी, ज्याची बली चढवतात. ईद ए कुरबांचा अर्थ आहे त्यागाची भावना. अरबी भाषेत कर्ब म्हणजे जवळ किंवा खूप जवळ आल्याचे म्हटले जाते. म्हणजेच या प्रसंगी देव माणसाच्या जवळ येतात.
 
कुर्बानी त्या प्राण्याला बळी देण्याचा विधीला म्हणतात, जी उपवासाच्या महिन्यात दहावी, अकरावी, बारावी आणि तेराव्या तारखेला देवाला खूश करण्यासाठी हजची विधी करीत असताना जिबह म्हणजे बळी दिली जाते.
 
बंधुत्वाच्या या सणाची सुरुवात अरब मधून झाली आहे पण 'तुजके जहांगिरी' मध्ये लिहिलेले आहे की जे उत्साह, आनंद, जोष भारतातील लोकांमध्ये ईद साजरी करण्याचे आहे, ते समरकंद, कंधार,  इस्फाहान, बुखारा, खुरासान, बगदाद आणि तबरेज सारख्या शहरात देखील सापडणार नाही, येथे इस्लामचा जन्म भारताच्या आधीच झाला होता.
 
मुघल राजा जहागीर आपल्या प्रजेसह ईद ए अजहा साजरा करीत होते. जे मुस्लिम बांधव नाही त्यांना वाईट वाटू नये, म्हणून ईदच्या दिवशी संध्याकाळी दरबाऱ्यांत त्यांच्यासाठी हिंदू आचारींकडून विशेष शुद्ध वैष्णव स्वयंपाक बनविला जात होता.
 
याचे पुरावे आहेत की ईदचा सण साजरा करण्याची परंपरा भारतात मुघलांनी सुरू केली असे. म्हणून ईदच्या दिवशी आजकाल भारतात असे दिसून येत की जसं की हे संपूर्ण भारतवर्षाचा आपला सण आहे. हीच भारतीय संस्कृतीची गौरवपूर्ण परंपरा आहे.