1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 8 जून 2024 (15:17 IST)

मुंबई पोलिसांवर दगड फेक करणाऱ्या 200 लोकांविरोधात गुन्हा दाखल, 57जणांना अटक

महानगरपालिका अतिक्रमण विरोधी दल बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. तसेच सोबत सुरक्षासाठी पोलिसांची देखील एक टीम गेली होती. पण निवासी हे सांगत विरोध करू लागले की मागील 25 वर्षांपासून ते तिथे राहत आहे. 
 
मुंबईमधील पवई परिसरात दोन दिवसांपूर्वी महानगरपालिका अतिक्रमण विरोधी अभियान दरम्यान पोलिसांवर दगडफेक प्रकरणात 200 पेक्षा जास्त लोकांवर कारवाई करण्यात अली आहे. तर 57 लोकांना ताब्यात घेतले आहे. 
 
एका अधिकारींनी ही माहिती दिली की, जय भीम नगर झुग्गी बस्तीमध्ये गुरुवारी बृहमुंबई महानरपालिका अतिक्रमण विरोधी अभियान दरम्यान दगडफेक मध्ये कमीतकमी 15 पोलीस, महानगरपालिकेचे पाच इंजिनियर आणि मजूर जखमी झाले आहे. 
 
अधिकारींनी शुक्रवारी सांगितले की, ''पोलीस आणि बृहमुंबई नगर निगम अधिकारींवर दगडफेक केली म्हणून 200 लोकांविसरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर 57 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वावर साक्री कर्मचारी याच्या कर्तव्यात बाधा टाकणे आणि दंगा करणे याचा आरोप आहे. महानगरपालिकेने पहिले सांगितले होते की, पवई आणि तिरंदाज एक जमिनीवर बेकायदेशीर झोपड्या बनवण्यात आल्या होत्या. राज्य मानवाधिकार आयोग ने या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.