आदिवासी विकासमंत्री सावरा अडचणीत
आज आदिवासी बांधवांनी विविध मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातील वाडामध्ये आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या घराला घेराव आणि ठिय्या आंदोलन केले आहे. अखिल हे आंदोलन भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे.
हे आंदोलन शेतकरी, देवस्थान शेतकरी आणि जंगल निवासी जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्याची मागणीसाठी करण्यात येणार आहे.
यावेळी आदिवासी बंधूनी पेसा कायदा मंजूर करावा, वनजमिनी नावावर कराव्यात, तांदूळ, वरी आणि नाचणीला योग्य भाव मिळावा, आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची अवस्था सुधारावी, अशा अनेक मागण्या या मोर्चामधून करण्यात येणार आहेत. यावेळी हजारो बांधव या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले आहेत.