मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (10:24 IST)

केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कुणाला घाबरवणं नाही तर मनातून भीती दूर करणं - नरेंद्र मोदी

"केंद्रीय तपास संस्थांचं काम कुणाला घाबरवणं नाही, तर त्यांच्या मनातील भीती दूर करणं हे आहे. आपल्याला भ्रष्टाचाराची पाळेमुळे संपवावी लागणार आहेत," असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
 
बुधवारी (20 ऑक्टोबर) एका रेकॉर्डेड व्हीडिओच्या माध्यमातून CBI आणि CVC च्या अधिकाऱ्यांशी नरेंद्र मोदी बोलत होते.
 
यावेळी मोदी पुढे म्हणाले, "भ्रष्टाचार छोटा असो किंवा मोठा, तो कुणाचा ना कुणाचा हक्क हिरावून घेतो. त्यामुळे सामान्य नागरिक आपल्या अधिकारांपासून वंचित राहतात. भ्रष्टाचारामुळे राष्ट्राच्या प्रगतीत बाधा निर्माण होते."
"देशाची फसवणूक करणारे, गरिबांना लुटणारे कितीही ताकदवान असले, ते देशात किंवा जगात कुठेही असले तरी त्यांना दया दाखवली जाणार नाही. सरकार त्यांना सोडून देत नाही असा विश्वास आज देशातील प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे," असंही मोदींनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली आहे.