1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 नोव्हेंबर 2021 (11:25 IST)

भाऊबीजेआधी बहिण भावावर काळाचा घाला, दिवाळीसाठी जाताना दोघांचा जागीच मृत्यू

दिवाळीच्या आनंदाला हिंगोलीमध्ये धक्का बसला आहे. येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भाऊबीजेच्या पूर्वीच बहिण भावावर काळाचा घाला पडला. भीषण अपघातामध्ये सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
 
भाऊबीजेपूर्वी सख्ख्या बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वसमत तालुक्यात घडली. दिवाळीला मामाच्या गावी जात असताना बहिण भावावर काळाने घाला घातलाय. टाकळगाव रोडवर ही घटना घडलीय. यामध्ये आदर्श अरविंद सूर्य वय वर्ष 9, व कीर्ती अरविंद सूर्य वय वर्ष 8 या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता नांदेड येथे हलविण्यात आले आहे. 
 
टाकळगाव येथून वसमतकडे येणाऱ्या टाटा एस मॅजिक पिकप क्रमांक  MH 22 AA 16 यांनी मोटर सायकल MH 26 U 2957 ला जोरदार धडक दिली.  त्यामुळे बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला तर सोबतच आलेल्या मामा राजू खिलारे वय वर्ष 24 व मृत्यू झालेल्या मुलांची मोठी बहीण आरती अरविंद सुरय्या जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वसमत तालुक्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.