शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (13:56 IST)

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे कंगना राणौतला प्रत्युत्तर, 'चीन सीमेमध्ये घुसखोरी करत आहे, मोदी सरकार दुसरा गाल पुढे करत आहे'

कंगना राणौतने केलेल्या महात्मा गांधींवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा केंद्रातील मोदी सरकारवर (पीएम नरेंद्र मोदी) हल्लाबोल केला. कोणी एका गालावर थापडा मारला तर दुसरा गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य मिळत नाही, असे कंगना राणौतने म्हटले आहे. 1947 मध्ये भिकेत स्वातंत्र्य मिळाले. खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले (मोदी सरकार आल्यानंतर).
या वक्तव्याला प्रत्युत्तर देत संजय राऊत म्हणाले, 'चीन आमच्या सीमेत घुसखोरी करत आहे. आपण काय करत आहोत ? मोदी सरकार शांतपणे हे बघतआहे . हे केंद्रातील मोदी सरकारचे गाल पुढे करण्यासारखेच आहे. काश्मीरमध्ये पंडित मारले जात आहेत. बरच काही चालले आहे. हे सगळं मॅडमला कळायला हवं. , अशी काही मतं असू शकतात ज्यावर आपल्यात मतभेद असू शकतात. बाळासाहेबांनीही त्यांच्यावर अनेकदा टीका केली आहे. परंतु स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची प्रमुख भूमिका कोणीही नाकारू शकत नाही. महात्मा गांधी जगाचे महानायक होते आणि आहेत. मोदीजीही राजघाटावर जाऊन त्यांना पुष्प अर्पण करतात, जगावर आणि देशावर आजही गांधींच्या विचारसरणीचा प्रभाव आहे, आणि राहील.