शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 6 मे 2021 (13:13 IST)

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे.
 
देशातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण पडत असल्याने भारताने परदेशातून मदत मागवली होती. ती मदत कुठे गेली, असा प्रश्न राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. याशिवाय इतर चार प्रश्नही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विचारले आहेत.
 
ट्वीट करून राहुल गांधी म्हणाले, "आत्तापर्यंत भारताला कोणकोणत्या गोष्टींचा पुरवठा झाला? त्या गोष्टी कुठे आहेत? त्याचा फायदा कुणाला होत आहे? त्यांचं राज्यांना कशा पद्धतीने वाटप झालं? या सगळ्यात पारदर्शकता का नाही?" ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.