शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : रविवार, 19 मार्च 2023 (16:31 IST)

Health : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्याव्या का?

हल्ली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबाबत बरीच चर्चा होते. विशेषत: कोरोनाच्या काळात रोगप्रतिकार शक्तीचं महत्त्वं अनेकांना पटलं आणि त्याचं गांभीर्य कोरोनानंतरच्या काळातही टिकून आहे. सोशल मीडियावर तर रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी, त्यासाठी काय खावं, काय खाऊ नये असं बरंच काही सांगितलं जातं. पण त्यातल्या तथ्याची अनेकांना माहिती नसते आणि खात्रीही नसते. अगदी अन्नधान्य-फळ-फुलांपासून ते मंत्र-तंत्र आणि पूजापाठापर्यंत काहीही सूचना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय म्हणून सोशल मीडियावर शेअर केल्या जातात.
 
एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या प्रकारे सांगितल्यानं अनेकांचा गैरसमज होतो, गोंधळ होतो. हाच गोंधळ आपण या बातमीतून कमी करण्याचा प्रयत्न करू.
 
सर्वप्रथम रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय, तर आपल्या शरीराला एखाद्या आजारापासून, रोगापासून वाचवण्याचं काम रोगप्रतिकारक शक्ती करते. आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी हा त्याचा मुख्य भाग असतो.
 
आपल्या शरीराला आजारापासून संरक्षित करणं आणि एखाद्या आजाराचा संसर्ग झाल्यानंतर रोगजंतूला नष्ट करणं हे आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींचं आणि ते बनवणाऱ्या अँटीबॉडीजचं काम असतं.
 
लस एकमेव अशी गोष्ट आहे, जी आपल्या रक्तपेशींना संसर्ग होण्याआधीच रोगप्रतिकारक शक्ती देते.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला दररोज ‘संतुलित आहारा’ची आवश्यकता असते. विशेषत: आपल्या आहारात पुरेसे प्रथिने असणे आवश्यक आहेत.
 
यासाठी तुम्ही दररोज फळे आणि भाज्या खाऊ शकता. तसंच, दररोज व्यायाम करून, निरोगी जीवनशैली राखून आणि मानसिक ताण कमी करता येईल. शिवाय, योग आणि ध्यान अशा पद्धतींच पद्धतींचा अवलंब करू शकतो.
 
अशा पद्धतीने रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. इतर कुठला शॉर्ट कट नाहीय. रोगप्रतिकारक शक्तीसाठी शॉर्ट कट अवलंबायला गेल्यास फसवणूकच होण्याची अधिक शक्यता आहे. शिवाय, आरोग्यासाठी घातकही ठरू शकतं आणि परिणामी जीवावर बेतू शकतं.
 
आपलं शरीर शेवटच्या श्वासापर्यंत तंदुरुस्त राहिलं पाहिजे, ही जबाबदारी आपली. त्यामुळे शरीराला हवं-नको ते पाहणं, त्याची काळजी घेणं, त्यासाठी आवश्यक गोष्टी करणं महत्त्वाचं आहे.
 
निरोगी शरीर, रोगप्रतिकारक शक्ती यासंबंधी काही गोष्टी, ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे, त्या अशा :
 
भूक लागल्यास अन्नच खाल्लं पाहिजे. औषध हा अन्नाला पर्याय असू शकत नाही.
इन्फ्युजन्सचा (तातडीनं बरं वाटावं किंवा ऊर्जा मिळावी म्हणूनची कृती किंवा काढा) काहीही फायदा होत नाही. उलट त्यामुळे अॅसिडिटी वाढते आणि विनाकारण आजाराला निमंत्रण मिळतं.
वाफ घेतल्यानं किंवा पाणी प्यायल्यानं विषाणू मरत नाहीत. कारण ते नाक, तोंड, घशातून पोटात जात नाही.
दररोज मल्टी-व्हिटॅमिन गोळ्या घेतल्यानं काहीही फायदा होत नाही. जोपर्यंत अशा गोळ्यांची अगदीच कुठल्यातरी आजाराशी संबंधानं आवश्यकता आहे, तोवर त्यांचा काहीच उपयोग होत नाही.
आपल्याला व्हिटॅमिन्सची आवश्यकता आहे का, आणि किती आवश्यकता आहे, यासाठी चाचण्या केल्या पाहिजेत.
हल्ली अनेकदा पिकांमधील बदलाबाबत चर्चा होते. पण खरंतर आपल्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीची चर्चा व्हायला हवी. कारण तिथेच मोठी समस्या आहे.
 
आपल्या शरीराला घातक असलेले जंक फूड खाणे, शारीरिक हालचाल कमी करणे, मीठाशिवाय बाटलीबंद पाणी पिणे, उन्हात न जाणे, तंबाखू आणि मद्य नियमित प्राशन करणे इत्यादी गोष्टींमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. या सर्व गोष्टींकडे गांभिर्यानं पाहून, त्यात आवश्यक सुधारणा न करता, केवळ एखाद्या व्हिटॅमिनच्या गोळीने आपण निरोगी राहू, अशी अपेक्षा करणं अवास्तव आहे.
 
अनेकजण असा विचार करतात की, तांब्याच्या कपात पाणी प्यायला हवं, किंबहुना, तांब्याची भांडी, ग्लास आणि कप वापरायला हवेत. पण आपल्यात खरंच तांब्याची कमतरता आहे का आणि ती वाढवण्याची गरज आहे का, याचा कुणी विचार करत नाही. जर याचा विचार केलात तर लक्षात येईल की, हे आवश्यक नाहीय.
 
शाकाहार करणाऱ्यांमध्ये प्रथिनांमधून मिळणाऱ्या विशिष्ट व्हिटॅमिन्सची कमतरता असणं स्वाभाविक आहे. तसंच, वृद्ध, मधुमेहग्रस्त किंवा पचनसंस्थेशी संबंधित समस्या असलेल्यांना काही प्रमाणात मिठाची कमतरता भासणंही स्वाभाविक आहे. विशेषत: व्हिटॅमीन बी 12.
 
ज्या लोकांना दारू पिण्याची सवय आहे, त्यांना व्हिटॅमिन बी 1, फॉलिक अॅसिड इत्यादींची जास्त गरज असते. म्हणून त्यांनी ही गरज गोळ्यांमार्फत भरून काढल्यास ठीक आहे.
 
दरम्यान, वर नमूद केलेल्या अनेक कारणांमुळे, विशेषतः मिठाच्या कमतरतेमुळे वाढत्या मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक वाढ कमी होण्याचा धोका असतो.
 
त्यामुळे अलीकडच्या काळात, मुलांना आवश्यक व्हिटॅमिन्स पुरवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे खाणे. ज्यांच्या आहारात दररोज चांगल्या भाज्या आणि फळे असू शकत नाहीत, ज्यांना RO UV चे पाणी क्षारविरहित प्यायल्याने डिहायड्रेट होत आहे, त्यांनी या सोप्या पद्धतीतही क्षार घेणे चांगले.
 
ज्यांना ते अन्नात घेता येत नाही, त्यांनी ते औषधाच्या रूपात घ्यावे.
 
Published By- Priya Dixit